इस्लामाबाद, दि. २३ (पीसीबी) – पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात क्रिकेट सामना खेळू नये, अशी मागणी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने केली. यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांने गांगुली असे विधान करुन पब्लिसिटी स्टंट करत आहे, त्याला निवडणुकीला उभे राहायचे आहे, असे म्हटले आहे.
मियाँदाद म्हणाला की, गांगुलीला निवडणुकीला उभे राहयचे आहे. त्यामुळे तो माध्यमांचे लक्ष त्याच्याकडे वेधून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी गांगुली पब्लिसिटी स्टंट करत आहे. गांगुलीच्या विधानामुळे क्रिकेटला काहीही फरक पडणार नाही.
गांगुलीने पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये, असे म्हटले होते. पाकिस्तानला आंतराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्यासाठी भारताने ठोस पावले उचलावीत, असा सल्लादेखील त्याने बीसीसीआय आणि भारत सरकारला दिला होता.