आमची लढाई काश्मीरसाठी, काश्मिरींविरोधात नाही – पंतप्रधान मोदी

0
514

जयपूर, दि. २३ (पीसीबी) – आमची लढाई दहशतवादाविरोधात आहे. आमची लढाई काश्मीरसाठी आहे, काश्मिरींविरोधात नाही. काश्मीरचे प्रत्येक मूल दहशतवादाविरोधात आहे आणि त्याला आम्हाला आमच्यासोबत ठेवायचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) केले.

राजस्थानातील सवाईमाधवपूर येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.  पुलवामा  हल्ल्यानंतर १०० तासात जैशचा कमांडर कामरान याला सुरक्षा दलांनी ठार केले. जवानांच्या या कृतीचा मला सार्थ अभिमान आहे, यावेळी आम्ही शांत बसणार नाही जशास तसे उत्तर देणारच, असा ठामा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

आपल्या सीमेवर वाघासारखे जवान आहेत, म्हणूनच आपण निधड्या छातीने जगाला सामोरे जात आहोत असेही मोदी म्हणाले. पुलवामा हल्ल्यानंतर देशातील काही भागातून काश्मीरी विद्यार्थ्यांवर हल्ल्याचे प्रकार  समोर आले आहेत. हे प्रकार पुन्हा व्हायला नकोत, असे ते म्हणाले.