लाहोर, दि. १९ (पीसीबी) – भारताने पाकिस्तानावर हल्ला केल्यास पाकिस्तानकडून भारताला चोख उत्तर देण्यात येईल, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे. भारतात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवा, अशी चर्चा सुरु आहे, हे मी समजू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानवर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले. पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंबंधी कोणताही पुरावा नाही, तरीही भारताकडून पाकिस्तानवर आरोप केला जात आहे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे
पुलवामा हल्ल्याचा पाकिस्तानला काय फायदा होणार आहे. पाकिस्तान स्थिरतेकडे जात असताना अशा गोष्टी पाकिस्तान करण्याचा विचार करणार नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला तयार आहे. भारताकडे पुरावे असतील तर भारताने आम्हाला द्यावेत, आम्ही कारवाई करु, असे आश्वासन इम्रान खान यांनी यावेळी दिले.