नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – दहशतवादाच्या नावाखाली छुपे युद्ध सुरू केले होते. त्यामुळेच भारताला सर्जिकल स्ट्राइक करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे सांगून जे लोक आमच्या देशातील शांतता भंग करण्याचा आणि देशाच्या विकासात अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) पाकिस्तानला दिला.