ओंजळीतून सांडण्यापूर्वीच ते समाजासाठी द्या; नाना पाटेकरांचा संदेश

0
631

जालना, दि. ८ (पीसीबी) – आपल्या ओंजळीत जेवढं मावतं तेवढंच घ्या, त्यापेक्षा जास्त घेण्याचा प्रयत्न केला तर ते सांडतं व मातीत मिसळतं. त्यापूर्वीच ते समाजासाठी दिलं तर त्याचा सदुपयोग होईल. परंतु त्याचा तमाशा करू नका व श्रेय घेण्याचाही प्रयत्न करू नका. कारण ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. सामुहिक विवाह सोहळा त्याचाच एक भाग आहे. मला मुलगी नाही परंतु या सोहळ्यातून ४८ मुलींचे कन्यादान करण्याचे समाधान मिळाले. शिवाय मुलगा मल्हार याचेही लग्न सामुहिक विवाह सोहळ्यातूनच करणार असल्याचे अभिनेते नाना पाटेकर यांनी जाहीर केले. ते शहरात आयोजित सामुहिक विवाह सोहळ्याप्रसंगी बोलत होते.