भारत सरकारसोबत काम करतो, कोणत्याही पक्षासाठी  नाही ; ‘डासू’चे राहुल गांधींना खडे बोल

0
483

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – काँग्रेसच्या सरकारसोबतही आम्ही काम केले आहे.  १९५३ मध्ये जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असताना आमच्या कंपनीने भारताशी पहिल्यांदा करार केला होता. आम्ही भारत सरकारसोबत काम करतो. कोणत्याही पक्षासाठी काम करत नाही,  अशा शब्दांत ‘डासू’ या कंपनीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी  एरिक त्रपिएर यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना खडे बोल सुनावले. रिलायन्स या कंपनीची निवडही आम्हीच केल्याचा खुलासा त्यांनी  केला.