महाराष्ट्रात १८ हजार पोलिसांच्या रिक्त जागांसाठी तब्बल १० लाखांहून अधिक अर्ज

0
227

मुंबई,दि. २९(पीसीबी) – पोलीस भरतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत संपण्यास आणखी दोन दिवस उरले असताना, सोमवारपर्यंत 18,331 पदे भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत महाराष्ट्र पोलीस विभागाला 10.5 लाख इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता एका जागेसाठी आतापर्यंत
जवळपास 57 अर्जदार झाले आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की भरती मध्ये SRPF पोलीस हवालदार, पोलीस ड्रायव्हर कॉन्स्टेबल आणि सशस्त्र दलातील पदे भरायची आहेत. विभागाने ९ नोव्हेंबरपासून नोकरीचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. अर्ज सादर करण्याचा बुधवार (३० नोव्हे) शेवटचा दिवस आहे.

एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले कि, “आम्ही अर्जांच्या केंद्रीकृत संकलनाचा पर्याय निवडला आहे. राज्याच्या आयटी विभागाने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे, ज्याद्वारे आम्ही ऑनलाइन अर्ज मागवत आहोत. सुरुवातीच्या तीन ते चार दिवसांत सुमारे २,००० लोकांनी अर्ज केले. तथापि, गेल्या तीन दिवसांत सुमारे 4 लाख लोकांनी अर्ज केले.”

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील महाविकास आघाडी सरकारने २०२० साठी फक्त रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला होता, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विभागाला दोन वर्षांसाठी भरती मोहीम राबविण्याचे निर्देश दिले.