मनसेला सोबत घेण्याची आमची भूमिका; पण काँग्रेसने निर्णय दिलेला नाही – राष्ट्रवादी

0
442

मुंबई, दि. २१ (पीसीबी) –  मनसेला  आघाडीत घेण्याची आमची भूमिका आहे. मात्र, काँग्रेसने याबाबत अद्यापही  निर्णय दिलेला नाही.  मनसे  सोबत आल्यास मोदी विरोधी गट आणखी एकत्र येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

मलिक म्हणाले की,  समविचारी पक्षांना सोबत घेण्याची  राष्ट्रवादीची भूमिका आहे.  पंतप्रधान  मोदी आणि भाजपच्या नेत्यांना शहिदांविषयी काहीच वाटत नाही. पुलवामा हल्ल्यानंतर मोदी नॅशनल पार्कमध्ये शुटिंग करण्यात व्यस्त होते. त्यामुळे  त्यांनी सर्वपक्षीय बैठकीला दांडी मारली. यावरुनच त्यांची जवानांविषयी किती आस्था आहे, हे दिसून येते.

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. सरकारकडून केवळ शेतकऱ्यांना आश्वासने दिली जात आहेत. शेतकऱ्यांना आपल्या हक्कांसाठी आंदोलन करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्यावर सरकारला बंधने आणता येणार नाही, असे मलिक म्हणाले.