जालना, दि. २१ (पीसीबी) – वंचित बहुजन आघाडीचा फायदा शिवसेना, भाजप आणि आरपीआयला होणार आहे. या आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला गर्दी होत आहे. मात्र, त्यांना मते मिळणार नाहीत, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
जालना येथे पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी एकटी लढली, तर त्यांचे भविष्य `प्रकाशमय` असणार आहे, असा टोला त्यांनी आंबेडकर यांना लगावला. त्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी निवडून येण्यासाठी लागणारे मत त्यांना मिळणे शक्य नाही, असेही ते म्हणाले.
वंचित आघाडी ही वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी आहे. वंचित आघाडीतील नेत्यांना सत्ता हवी असल्यास त्यांनी माझ्या सोबत यावे. वंचित आघाडीची जी हवा आहे ती हवा त्यांना निवडून आणणारी हवा नाही, अशी टीका आठवले यांनी केली.