भर पावसातील सभेनंतर शरद पवारांवर उद्यनराजेंकडून प्रश्नांचा वर्षाव  

0
892

कराड , दि. १९ (पीसीबी) – शरद पवार साहेब आपण आदरणीय होता आणि आहात, युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असते, चुकीची भाषा बोलताय तर आमचे एकदा ऐका, चुक तुम्ही नाही आम्ही केली राष्ट्रवादीला मतदान केले,चार निवडून आले ती चूक आमची आहे का? असा सवाल माजी खासदार उदयनराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना  केला आहे.

शरद पवारांच्या साताऱ्यातील भर पावसातील सभेत शरद पवारांनी मागच्या निवडणुकीत उमेदवार निवडताना माझी चूक झाली, मी जाहीर कबूल करतो, असे म्हटले होते. यावर उदयनराजे  यांनी कराडच्या सभेत चोख उत्तर दिले आहे. तसेच ‘काँग्रेस, राष्ट्रवादीची घाण धुवून काढण्यासाठी कालचा पाऊस होता, ढगाला लागली कळं काँग्रेस, राष्ट्रवादीची मतं गळं आणि कमळाची फुले फुलं’ , अशा गीतांच्या बोलावर त्यांनी टीका केली.

ते म्हणाले की, भगव्याची आठवण आता आली ही आमची चूक आहे का? सिंचनापासून वंचित ठेवले ही आमची चुक आहे का? तुमचा पुतण्या – – – – भाषा करतो ही आमची चूक आमची आहे का? राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घातले ही आमची चूक होती का?  अशा किती तरी चुकांची कबुली तुम्ही कधी देणार ?  कौरवांची साथ सोडून आम्ही पांडवांच्या साथीला आलो ही आमची चूक आहे का? आम्ही पाठीत खंजीर खूपसणाऱ्यांची साथ सोडली ती आमची चूक होती का? असा सवाल उदयनराजे यांनी पवारांना केला आहे.