मुंबई, दि. १२ (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याआधी उत्तर भारतीय समाजाची माफी मागावी. त्यानंतरच उत्तर भारतीय समाज त्यांना स्वीकारेल, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटले आहे.