तळेगाव, दि. १० (पीसीबी) – पत्नीचा विनयभंग केल्याच्या रागातून पती आणि त्याच्या मित्राने तरुणाच्या भावाचे अपहरण केले. त्यानंतर त्याच्या वडिलांना फोन करुन बायकोचा विनयभंग करणाऱ्या मुलगा आणि १० हजार रुपये घेऊन या आणि दुसऱ्या मुलाला घेऊन जा अशी धमकी दिली. ही घटना शुक्रवार (दि.८) सायंकाळी सहाच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी येथे जांभवडे ते इंदोरी रोडचे दरम्यान घडली.