नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले नेते आहेत, पण टीमला सोबत घेऊन जाणारे नेते नाहीत. मंत्रिमंडळाच्या जोरावर देश चालवण्याऐवजी गुजरातच्या धर्तीवर नोकरशहांच्या भरवशावर सरकार चालवण्याची त्यांनी चूक केली. त्यांनी प्रमाणापेक्षा जास्त आश्वासनेही दिली. त्यामुळे लोक नाराज असून नाराज मतदार त्यांना पुन्हा बहुमत देणार नाहीत,’ असे मत मोदींचे प्रशंसक असलेले अर्थतज्ज्ञ मेघनाद देसाई यांनी व्यक्त केले.