मुंबई, दि. ८ (पीसीबी) – कोकणात विध्वसंक प्रकल्प आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. तुमच्या जमिनी बळकावण्याचे परप्रांतीयांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, तुम्ही तुमच्या जमिनी देऊ नका, तुम्ही सावध राहा, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) येथे दिला.
मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात कोकणातील मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरे बोलत होते.