एक दुजे के लिए प्रमाणे शिंदे – फडणवीस सरकारचा राजकीय अंत लवकरच

0
137

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकार आणि सेनेच्या बंडखोर नेत्यांवर टीका केली आहे. शिवसेना सोडलेल्यांनी स्वतंज्ञ पक्ष तयार करावा, असा सल्लाही राऊतांनी दिला आहे. तसंच शिंदे फडणवीस सरकारचा राजकीय अंत लवकरच होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

राऊत म्हणाले, ज्यांनी शिवसेना सोडलेली आहे आणि शिवसेनेचा वापर करून मामुग्री मागू नका तुम्ही स्वतःचा स्वतंत्र पक्ष तयार करा. तुम्ही शिवसेना शिवसेना का करता. बाळासाहेब ठाकरे यांची ही खरी शिवसेना आहे या शिवसेनेचे पंखाखाली तुम्ही का जगता. तुम्ही स्वाभिमानासाठी बाहेर पडला असाल तर तुम्ही तुमचं स्वतंत्र स्थान निर्माण करा. शिवसेनेचा गैरवापर करू नका. हकालपट्टी करण्यात आलेली आहे असे अनेक लोक आहेत जे शिवसेना भाजप युती असताना पराभूत झालेले त्यांना भाजपचा पुळका आला आहे.

बंडखोर नेत्याला असं बोलावं लागतं त्याच्याविषयी आम्हाला काही आक्षेप नाही. महाराष्ट्राच्या जनतेत काय खळबळ माजली आहे हे आम्हाला माहित आहे आणि त्यावर स्पष्ट सांगतो. पण वर्षात ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून अनेक वर्ष हद्दपार आहेत. आमदार आणि खासदार हे पराभूत झाल्याचा इतिहास आहे. इतके दिवस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन मंत्रिमंडळ होऊ शकत नाही. नवीन सिनेमा राजकारणात सुरू आहे एक दुजे के लिए सिनेमा सुरू आहे. महाराष्ट्र मध्ये एक दुजे के लिये सिनेमा सुरू आहे पडदावर त्याचा अंत सुद्धा त्याच पद्धतीने होईल, असे ते म्हणाले.