कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य सरकारशी बोलणार ; मोदींचे शरद पवारांना आश्वासन

0
441

मुंबई, दि. १० (पीसीबी) – आलमट्टी धरणातील विसर्ग पुरेशा प्रमाणात करण्याबाबत कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य सरकारशी बोलणार असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिले असल्याची माहिती समोर आली आहे .

कर्नाटक सरकारने मागणीप्रमाणे लाख क्यूसेक्स प्रमाणात पाणी सोडत नसल्याने सांगलीतील पाणी पातळी जसशीच्या तशीच आहे ’, असे पवार यांनी म्हटले आहे. परिणामतः तेथील लोकांना महापुराचा सामना करावा लागत आहे .