रामदास आठवले आज पुरग्रस्तांना भेटणार

0
331

मुंबई, दि. १० (पीसीबी) – पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराने सांगली, सातारा, कोल्हापूर शहरे अक्षरश पाण्यात गेली आहेत. राज्य सराकर कडून पुरग्रस्तांना हवी ती मदत करण्यात येत आहे. सरकार पुरग्रस्तांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. राज्यसरकारच्य़ा मदतीपाठोपाठ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. आज ते पुरग्रस्त भागाची पाहणी करणार असून पुरग्रस्तांना भेटणार आहेत.

रामदास आठवले यांनी त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून कोल्हापूर दौयावर निघाले आहेत. त्यांचा आजचा नियोजित परभणी आणि बीड जिल्ह्याचा दौरा रद्द करण्यात आला असून बीड आणि मुंबईतील सत्काराचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची अधिकृत घोषणा रामदास आठवले यांनी जाहीर केली.