सातव्या टप्प्यातील लोकसभेच्या ५९ मतदारसंघात ६०.२१ टक्के मतदान

0
362

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज (गुरूवार) मतदान झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५९ मतदारसंघांत ६०.२१ टक्के मतदान झाले.  सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये ७३.०५ टक्के झाले आहे. तर या टप्प्यासाठी ७.२७ कोटी नागरिकांनी मतदान केले. यापैकी ३.४७ महिला होत्या. ३,३७७ तृतीयपंथीयांनीही मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. 

राज्यनिहाय मतदानाची टक्केवारी –

राज्य – मतदान
बिहार – ४९.९२ टक्के
हिमाचल प्रदेश – ६६.१८ टक्के
मध्य प्रदेश ६९.३८ टक्के
पंजाब – ५८.८१ टक्के
उत्तर प्रदेश ५४.३७ टक्के
प. बंगाल – ७३.०५ टक्के
झारखंड – ७०.५ टक्के
छत्तीसगड – ६३.५७ टक्के