अमेठी, दि. २५ (पीसीबी) – ही तर केवळ सुरुवात आहे. पुढे तर आणखी मज्जा येणार आहे’, अशी टिप्पणी करून मोदी सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयात घोटाळा कसा झाला हे येत्या काही महिन्यात उघड करणार आहे, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला. अमेठी दौऱ्यावर राहुल गांधी असून यावेळी त्यांनी राफेल करारावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला.