हिंजवडीत मैत्रिणीला इंटरव्ह्यूसाठी कंपनीत सोडून घरी परतणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू

0
2411

हिंजवडी, दि. २२ (पीसीबी) – मैत्रिणीला इंटरव्ह्यूसाठी कंपनीत सोडून घरी परतणाऱ्या एका तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास हिंजवडी येथे घडली.

अमन पांडे असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन पांडे आणि आदिती जयस्वाल हे मित्र होते. आज सकाळी आदितीचा हिंजवडीमधील एका कंपनीत इंटरव्ह्यू होता. यासाठी अमन तिला दुचाकीवरून सोडण्यासाठी गेला होता. आदितीला कंपनीच्या गेटवर सोडून तो परत निघाला. अमन हा १४० किमी प्रतितास या वेगाने दुचाकी चालवत होता आणि त्याने हेल्मेटही घातले नव्हते. विप्रो सर्कलच्या दिशेने येत असताना वळणावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो थेट दुभाजक ओलांडून दुचाकीसह विरुद्ध दिशेला जाणाऱ्या मार्गिकेवर पडला. याच दरम्यान तिथून एक कार जात होती. त्या कारखाली सापडून अमनचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहे.