युती न होण्याच्या शक्यतेने शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील धास्तावले

0
524

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याच्या स्थितीत नसल्याने पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेचे दोन्ही खासदार धास्तावले आहेत. मावळ मतदारसंघात सलग दोनवेळा आणि शिरूरमध्ये खासदार शिवाजीराव आढळराव पाटील सलग तीनवेळा निवडून येण्यामध्ये भाजपचा सिंहाचा वाटा राहिला आहे. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही खासदार मोदी लाटेमुळे निवडून आले हे उघड सत्य आहे. आता आगामी निवडणुकीत भाजपसोबत युती न झाल्यास मावळ आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचा विजय होणे अवघड आहे. त्यामुळेच मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूरचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे दोघेही भाजप-शिवसेना युती व्हावी यासाठी देव पाण्यात ठेवून बसले आहेत, असेच सध्याचे राजकीय चित्र आहे.