साध्वी प्रज्ञाला कधीच मनापासून माफ करु शकणार नाही – नरेंद्र मोदी

0
424

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी नथुराम गोडसेसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. आपण कधीच साध्वी प्रज्ञाला मनापासून माफ करु शकणार नाही असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. नथुराम गोडसे हा देशभक्त होता आहे आणि यापुढेही राहिल असे वक्तव्य भाजपाच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले होते. नथुरामला दहशतवादी ठरवणाऱ्या लोकांना या निवडणुकीत उत्तर दिले जाईल असेही साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी हे अत्यंत चुकीचे असून, त्यांना कधीच माफ करु शकत नाही असे म्हटले आहे.

मुलाखतीदरम्यान नरेंद्र मोदींना साध्वी प्रज्ञा यांनी नथुराम गोडसेसंबंधी केलेल्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आले. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, ‘नथुराम गोडसे किंवा गांधीजी यांच्यासंबंधी जी वक्तव्य करण्यात आली आहेत ती चुकीची असून समाजासाठीही वाईट आहेत. ही वक्तव्य निंदनीय आहेत. असे करणाऱ्यांना यापुढे १०० वेळा विचार करावा लागेल. सभ्य समाजात अशा पद्दतीची भाषा आणि विचारसरणी स्विकारली जाऊ शकत नाही. त्यांनी माफी मागितली असली तरी मी त्यांना कधीच माफ करु शकणार नाही’.