मोदींसारख्या अभिनेत्यापेक्षा अमिताभ यांनाच निवडून द्यायचे होते- प्रियंका गांधी

0
314

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या जागतिक किर्तीच्या अभिनेत्यापेक्षा अमिताभ बच्चन यांनाच निवडून द्यायला हवे होते. कारण अमिताभ बच्चन पंतप्रधान झाले असते तरीही तेही मोदींप्रमाणे तुमच्यासाठी काहीही करू शकले नसते असा खोचक टोला प्रियंका गांधी यांनी लगावला आहे. मिर्झापूर या ठिकाणी झालेल्या रॅलीत त्या बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक किर्तीचे अभिनेते आहेत. त्यांना पंतप्रधान म्हणून निवडल्यानंतर त्यांनी जनतेसाठी काहीही केले नाही. त्यांच्याऐवजी किमान अमिताभ बच्चन यांना तरी निवडून द्यायचे. अमिताभ बच्चन यांना पंतप्रधान केले असते तर तेदेखील मोदींप्रमाणेच काहीही करू शकले नसते असेही प्रियंका गांधींनी म्हटले आहे.

भाजपाचा हेतू फक्त सत्ता मिळवणे एवढाच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या निवडणुकीच्या वेळी दिलेले आश्वासने अद्यापही पाळली नाहीत. काँग्रेसने कधीही खोटी आश्वासने दिली नाहीत. काँग्रेसने कायमच शेतकऱ्यांच्या हितासाठी, सामान्य माणसाच्या हितासाठी कामे केली आहेत. मिर्झापूरमध्ये त्या बोलत होत्या. त्या बोलत असतानाच अजान झाली. त्यावेळी काही क्षणांसाठी प्रियंका गांधींनी त्यांचे भाषण थांबवले. अजान पूर्ण झाल्यावर त्यांनी पुढे बोलण्यास सुरूवात केली.

मागील पाच वर्षात ५ कोटी रोजगार कमी झाले आहेत. युवकांच्या हाताला काम नाही, जर काँग्रेसची सत्ता आली तर गरीबांचे भविष्य उजळेल असेही आश्वासन प्रियंका गांधींनी दिले. प्रियंका गांधी या मिर्झापूरमधले काँग्रेसचे उमेदवार ललितेश त्रिपाठी यांच्या प्रचारासाठी आल्या. त्यांनी रोड शोही केला. रोड शोच्या दरम्यान त्या जेव्हा वसीगंज चौकातून जात असताना भाजपा कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीचा नारा दिला. ज्यानंतर प्रियंका गांधींनी उत्तर दिले की मोदींसारख्या जागतिक किर्तीच्या अभिनेत्यापेक्षा अमिताभ यांनाच निवडून द्यायचे होते. आता यावर भाजपा नेते काय प्रतिक्रिया देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.