कोल्हापूर, दि.१० (पीसीबी) – भाजप युतीबाबत सकारात्मक आहे. मात्र, पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर युतीवर शिक्कामोर्तब करण्यात येईल. त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागेल’, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. राज्यातील लोकसभेच्या ६ आणि विधानसभेच्या ९५ जागांबाबत असलेला तिढा चर्चेतून दूर करण्यात येईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.