राम मंदिर निर्मितीच्या अध्यादेशाची मागणी अयोग्य-आठवले

0
316

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – निवडणुका जवळ आल्या आहेत आणि सध्या देशात राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजतोय. अशात राम मंदिराच्या निर्मितीसाठी सरकारने अध्यादेश काढावा अशीही मागणी होते आहे. मात्र केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही मागणी योग्य नसल्याचे म्हटले आहे. हिंदू आणि मुस्लीम बांधव आपल्या देशात गुण्यागोविंदाने वास्तव्य करत आहेत. त्यांच्यात कोणतीही फूट पडावी असे मला वाटत नाही, असेही आठवले यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.