रामजन्मभूमी अयोध्या वादावर मध्यस्थी तोडगा काढणार; सुप्रिम कोर्टाकडून त्रिसदस्यीय समिती स्थापन

0
427

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – रामजन्मभूमी असलेल्या अयोध्या प्रकरणी मध्यस्थी होईल, असे सुप्रीम कोर्टाच्या ५ सदस्यीय घटनापीठाने शुक्रवारी (दि. ८) स्पष्ट केले. मध्यस्त नियुक्तीसाठी न्यायमूर्ती खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्री राम पंचू यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाबाबतच्या बातम्या प्रसारित करण्यावरही प्रतिबंध लावला आहे. मध्यस्थीसाठी समितीला आपले काम १ आठवड्यांमध्ये सरू करायचे असून पुढील ८ आठवड्यांमध्ये आपला अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.