मुंबई, दि. १५ (पीसीबी) – राज्यातील ‘जलयुक्त शिवार’ योजना कुचकामी ठरली आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले जात आहे. याचा फटका दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून राज्य सरकारवर फटकारे मारले आहेत. हे व्यंगचित्र आज (सोमवारी) राज ठाकरे यांनी प्रकाशित केले आहे.