राज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळाची घोषणा करणार – मुख्यमंत्री

0
507

जळगाव, दि. ८ (पीसीबी) – राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) येथे पत्रकार परिषदेत दिली. 

यंदा राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी जिल्ह्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन शासकीय यंत्रणेला उपाययोजना करण्याबाबत आदेश दिले आहेत. महसूल व कृषी विभागाकडून  अहवाल  मागविले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, ग्रामसडक योजना तसेच अन्य योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांनी  पोलीस अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था, गुन्ह्यांचा आलेख याचा आढावा घेतला.