राजस्थानात भाजपच्या १०० आमदारांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय

0
896

जयपूर, दि. २० (पीसीबी) – राजस्थानातील आमदारांची कामगिरी बघता १६० पैकी १०० आमदारांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपच्या कार्यकारिणीने घेतला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नमो’ अॅपवरही संबंधित आमदारांविरोधात स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. 

राज्यातील वसुंधरा राजेंच्या नेतृत्वाखालील सरकारची गेल्या पाच वर्षातील कामगिरी असमाधानकारक आहे. लोकांच्या मनात भाजपच्या मंत्र्याबद्दल आणि आमदारांबद्दल प्रचंड रोष आहे. भाजपच्या निरीक्षकांनीही लोकांमध्ये प्रचंड रोष असल्याचे पक्ष कार्यकारिणीला सांगितले आहे. तसेच आपल्या लोकप्रतिनिधींबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नमो अॅप सुरू केले होते. या अॅपवरही राज्यातील ८० ते १०० आमदारांवर प्रचंड टीका केली आहे. त्यामुळे या १०० आमदारांना पुन्हा संधी न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, १०० आमदारांना पुन्हा उमेदवारी न देता त्यांच्याजागी तरूण चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. भाजपने अॅट्रोसिटीबद्दल घेतलेल्या भूमिकेमुळे राजपूत समाजही भाजपला या निवडणुकीत मतदान करण्याची शक्यता नाही. पंतप्रधान मोदी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन प्रचार करत आहेत. त्यामुळे राजस्थानात भाजपाला सत्ता राखण्यात यश येणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.