‘या’ झाडाचे फळ खाल्ल्यास तृतीयपंथीयांनी देखील मूल होते; मौलानांचा वादग्रस्त दावा  

383

औरंगाबाद,  दि. १८ (पीसीबी) –  खुलताबाद येथील दर्ग्यात  आसेचे झाड असून या झाडाचे फळ खाल्ल्यास निपुत्रिकांना मुले होतात. त्याचबरोबर  हे फळ खाल्ल्यास तृतीयपंथीयांना देखील मूल होऊ शकेल, असा दावा येथील मौलानांनी केला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या औरंगाबादमधील कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन  करून  हा प्रकार उघडकीस आणला आहे.