‘…म्हणून तिला उपाशीपोटी ठेवून तिचा चालला होता छळ ‘

0
212

चाकण, दि.२२ (पीसीबी) – लग्नात हुंडा दिला नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ केला असल्याची फिर्याद चाकण पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. त्यानुसार सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती कैलास सदाशिव झुंजारे, दीर दयानंद सदाशिव झुंजारे, दीर शिवाजी सदाशिव झुंजार, दीर तुळशीराम सदाशिव झुंजारे, सासू आणि दोन नणंदा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 9 जून 2020 ते 27 डिसेंबर 2020 या कालावधीत नांदेड मधील उमरी तालुक्यातील मनूर येथे, हवेली तालुक्यातील तळवडे येथे आणि खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथे घडला आहे.

विवाहितेच्या लग्नात तिच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या लोकांना हुंडा दिला नाही. तसेच सासरच्या लोकांचा व्यवस्थित मानपान केला नाही, असे म्हणत सासरच्या लोकांनी विवाहितेला शिवीगाळ, मारहाण केली. तिला उपाशीपोटी ठेऊन तिचा छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.