वर्धा, दि. २ (पीसीबी) – मोदी चौकीदार नाही, तर ‘राफेल’मध्ये भागीदार आहेत, अशी टीका करून ‘राफेल विमानांची किंमत६०० कोटींवरुन १६०० कोटींवर कशी गेली? मोदीजी, तुमचे मित्र अनिल अंबानीजी आहेत, ज्यांना तुम्ही राफेल विमानांचा करार दिला आहात, ज्यांच्या खिशात तुम्ही आपल्या देशातील माताभगिनींच्या खिशातील ३० हजार कोटी घातले, त्या अंबानींनी उभ्या आयुष्यात एकही विमान बनवले नाही, असे शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्यावर घणाघात केला .