मोदींचा खासगी नोकरदारांसाठी महत्त्वाचा निर्णय; ग्रॅच्युटी मिळण्याचा किमान कालावधी ३ वर्षे करणार

0
486

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – मोदी सरकार खासगी क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या नोकरदारांसाठी लवकरच मोठा निर्णय घेणार आहे. खासगी नोकरदारांसाठी ग्रॅच्युटीसाठी आवश्यक असलेला किमान कालावधी सध्या ५ वर्षे आहे. हा कालावधी ३ वर्ष करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा विचार सरकार करत असल्याचे सूत्रांकडून समजते. या निर्णयामुळे एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीमध्ये ३ वर्षे नोकरी केल्यास त्याला ग्रॅच्युटीचा लाभ घेता येईल. यामुळे लाखो नोकरदारांना आर्थिक फायदा होणार आहे.