नवी दिल्ली,दि.२१(पीसीबी) – भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी “मुसलमानांना १९४७ सालीच पाकिस्तानात पाठवलं असतं तर बरं झालं असतं” असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
गिरीराज सिंह म्हणाले, मोहमद अली जिन्ना वेगळा पाकिस्तान निर्माण करण्याच्या तयारीत होते. आपल्या पूर्वजांनी मोठी चुक केली आहे, त्याचीच किंमत आपण आज चुकवत आहोत. जर तेव्हाच मुस्लीम बांधवांना पाकिस्तानात पाठवलं असतं तर हिंदू एकत्र राहिले असते.
देशातील क्रांतीकारी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते, तेव्हा काही लोक देश तोडत होते. आपल्या पूर्वजांनी काही चुका केल्या. त्यामुळेच आपण आज ही परिस्थिती पाहत आहोत, असंही ते म्हणाले आहेत.