माहिती अधिकार कायद्यात बदल केल्यास आंदोलन; अण्णा हजारेंचा इशारा

0
461

अहमदनगर, दि. २४ (पीसीबी) – माहिती अधिकार कायद्यात बदल करण्यासाठी मोदी सरकारने संसदेत विधेयक मांडले आहे. या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक झाले  आहेत. कायद्यात बदल केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्यांना आळा बसावा,  यासाठी कायद्यातील कलम ४ मध्ये एक तरतूद आहे. यामध्ये सर्व संस्थांनी आपल्या कार्यालयाची सर्व माहिती इंटरनेटवर टाकावी, असे बंधनकारक  आहे.  मात्र, या कायद्याची अंमलबजावणी करण्याऐवजी आपल्या फायद्यासाठी सरकार या कायद्यात बदल करत आहे, असा आरोप अण्णा हजारे यांनी केला.

दरम्यान, देशभरातून माहिती अधिकार कायद्यातील  बदल करण्यास  जोरदार विरोध  केला जात आहे. काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांना याविरोधात एकजूट दाखवण्याचे आवाहन केले आहे. तर आता अण्णा हजारे यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.