महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार ?

0
1360

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हा सर्वोच्च नागरी किताब देण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. याबाबत २६ जानेवारीरोजी अंतिम घोषणा होण्याची शक्यता आहे.