मराठा समाजाने जल्लोष करावा, मुख्यमंत्र्यांनी १६ टक्के आरक्षणाचा शब्द पाळला – आमदार लक्ष्मण जगताप

0
832

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला असून, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले आहे. भाजप सरकार हे दिलेला शब्द पाळणारे आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता मराठा समाजाने जल्लोष करावा, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.