मंदिर बांधण्यापेक्षा गरीबांच्या तोंडात दोन घास घाला – नाना पाटेकर

0
540

पुणे, दि. २ (पीसीबी) – राज्यातील दुष्काळामुळे शेतकरी होरपळत आहे. मराठवाड्यात एक मूठ धान्य आणि एक पेंडी चारा प्रत्येकाने दिला. तर मराठवाड्यातील जनावरांना आणि माणसांना हातभार लागेल. नाइलाजाने गावाकडील लोक आज शहरात येत आहेत, ती भिकारी नाहीत. त्यांना भिकाऱ्यासारखी वागणूक देऊ नका, असे आवाहन अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.