भारतातील जनतेने या फिकीराची झोळी भरली – पंतप्रधान मोदी

0
441

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – भारतातील जनतेने या फिकीराची झोळी भरली,  अशा शब्दांत   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या विजयाबद्द्ल जनतेचे आभार मानले. लोकसभा निवडणुकीत भाजपला  घवघवीत यश मिळाल्यानंतर मोदींनी जनतेला संबोधित केले.   भारताच्या लोकशाहीची ही ताकद जगाने ओळखायला हवी. या लोकशाहीच्या उत्सवात लोकशाहीसाठी ज्या ज्या लोकांनी बलिदान दिले आहे, जखमी झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांसाठी माझी सहवेदना प्रकट करतो, असे मोदी म्हणाले.

या निवडणुकीसाठी आम्ही नव्या भारतासाठी जनादेश घेण्यासाठी गेलो होतो. देशातील कोटी कोटी नागरिकांनी या फकिराची झोळी भरली आहे. मी भारताच्या १३० कोटी नागरिकांसमोर नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानतो, आजचा हा विजय कुठल्या पक्षाचा, नेत्याचा नसून देशाचा आहे. कोणी विजयी झाले आहे, तर तो भारत देश, भारताची लोकशाही विजयी झाली आहे. त्यामुळे आजचा विजय जनतेला समर्पित करतो, असे मोदी म्हणाले.

यावेळी मोदी यांनी निवडणूक आयोगाचे आभारही मानले. निवडणूक आयोग, सुरक्षा दलांना, ही निवडणुकीची व्यवस्था सांभाळणाऱ्या प्रत्येकाला उत्तम प्रकारे निवडणूक प्रक्रिया पार पाडल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आज दिवसभर मी व्यस्त होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकाल मला पाहता आला नाही.