भाजप-शिवसेना युती झाल्यास खासदारकीच्या ४८ पैकी ४५ ते ४६ जागांवर विजय होईल – रामदास आठवले

0
571

सातारा, दि. २३ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होईल. हे दोन्ही पक्ष एकत्र आले, तर महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ ते ४६ जागांवर शिवसेना-भाजपचे उमेदवार सहज निवडून येतील. पण विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येतील की नाही हे सांगता येणार नाही, असे केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले.