आढळराव पाटील यांचा शेवटच्या मतदारासोबत असलेला कनेक्ट, डाऊन टू अर्थ व्यक्तीमत्व

0
35

उरुळी कांचन : विकासाचे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर आपल्याला शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करावे. समोरचा उमेदवार हा कुठलेही प्रश्न मार्गी लावू शकला नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर हल्लाबोल केला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांच्या उपस्थितीत उरुळी कांचन येथे जाहीर सभा झाली. यावेळी अजित पवार बोलत होते.

सत्तेतून प्रश्न मार्गी लागतात म्हणून आम्ही सरकारमध्ये गेलो आहोत. मी कामाचा माणूस आहे. एक घाव दोन तुकडे करणारा व्यक्ती आहे. उरळी कांचन करांनो समोरच्या व्यक्तींला खासदार की मध्ये काहिच रस नाही. त्यामुळे आपल्यासाठी कामाची असणारी व्यक्ती म्हणजे आढळराव पाटील आहेत, त्यांना विजयी करा. थेऊर कारखाना सुरु करणे, उपबाजार, ट्रँफिक असे सर्व प्रश्न आपण मार्गी लावू, असंही ते म्हणाले.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मला 33 वर्षे झाली 91 साली मला खासदार म्हणून निवडून दिले होते. तसा आपला जुना संबंध आहे. ही निवडणूक देशाची सूत्र कोणाच्या हातात द्यायची. देश कोण योग्य दिशेने घेऊन जाईल याबाबतची आहे. कोणाच्या विचाराचा खासदार दिल्लीमध्ये निवडून पाठवायचा आहे याबाबतची ही निवडणूक आहे. मागील काळातील 2004, 2009 आणि 2014 अशा निवडणुकांमध्ये आम्ही अनेकदा आढळराव पाटील यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला परंतू आढळराव पाटील यांचा शेवटच्या मतदारासोबत असलेला कनेक्ट, सामाजिक काम, डाऊन टू अर्थ राहण्याची त्यांची पद्धत यामुळे ते आम्हाला शक्य होत नव्हते.

पुढे बोलताना ते म्हणाले, या व्यक्तीने कुठलेही विकासाचे प्रश्न मार्गी लावले नाही. मतदारसंघात पिरकलेही नाहीत. आता मात्र या मतदार संघातील पाणी, ट्र्रँफिक, कारखाना सुरु करणे हे सर्व प्रश्न आम्ही नरेंद्र मोदी, अमित शहा , एकनाथ शिंदे , देवेंद्रजी फडणवीस सगळे मिळून हे प्रश्न सोडवू. विकासाचे सर्व प्रश्न तडीस नेऊ. उरुळी कांचन आणि मतदार संघातील सर्व प्रश्न सोडवू त्यासाठी आपण सर्वांनी येत्या 13 तारखेला आढळराव पाटील यांच्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करा.”