पुढील २४ तास महत्त्वाचे, कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे – राहुल गांधी

0
414

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – पुढील २४ तास महत्त्वाचे आहेत. कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे, अशा सुचना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या  निकालाला काही तास शिल्लक राहिले आहेत, या पार्श्वभुमीवर  राहुल गांधी यांनी ट्विट करून कार्यकर्त्यांना  सूचना दिल्या आहेत.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘प्रिय कार्यकर्त्यांनो, पुढील २४ तास महत्त्वाचे आहेत, सतर्क राहा. तुम्ही सत्यासाठी लढत आहात. खोट्या एक्झिट पोलच्या चुकीच्या प्रचाराने निराश होऊ नका. स्वत:वर आणि काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा. तुमची मेहनत वाया जाणार नाही.

दरम्यान, बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपप्रणीत ‘एनडीए’चे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा अंदाज वर्तवला आहे. यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. तर विरोधी पक्षांमध्ये शांतता आहे. मात्र, कोण बाजी मारणार हे गुरूवारीच निकालादिवशी स्पष्ट होणार आहे. सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.