पुढची २५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल – संजय राऊत

0
572

मुंबई, दि.१५ (पीसीबी)- मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही, कारण पुढची २५ वर्ष राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. महाराष्ट्रासोबत असलेलं आपलं नातं तात्पुरतं नसून आम्ही राज्यातच राहणार. येत-जात नाही राहणार असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. संजय राऊत यांचा आज वाढदिवस असून त्यांना पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपावर हल्ला चढवला.

संजय राऊत यांना यावेळी शिवसेना राष्ट्रवादीसोबत मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून घेणार का असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “फक्त पाच नाही तर पुढील २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल”. “महाराष्ट्र सध्या विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रस्थानी आहे. तरीही पायाभूत सुविधा आणि ओला दुष्काळ यावर अधिक काम करावं लागणार आहे,” असंही त्यांनी यावेळी सांगितले.

“आम्हाला ओला दुष्काळ, पायाभूत सुविधा अशा बाबींवर अजून काम करावं लागणार आहे. आमच्यासोबत जे जोडले गेले आहेत ते अनेक वर्ष सत्तेत होते. त्यांना राज्य चालवण्याचा मोठा अनुभव आहे. राज्याचा कारभार सुरळीत चालवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. पुढील सरकार हे शिवसेनेच्या नेतृत्वातच येणार आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरीही ते बदलता येणार नाही,” असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.