पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सलग तीनवेळा निवडून आलेले खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा यंदा पराभव झाल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला जोरदार राजकीय धक्का बसला आहे. निवडणूक प्रचाराला सुरूवात होण्यापूर्वी आढळराव पाटील यांच्यासाठी सुरक्षित समजला जाणाऱ्या शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीने डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजकीय चित्र बदलले. तसेच १५ वर्षे खासदार असूनही आढळराव पाटील यांना मतदारसंघात ठोस कामे करता न आल्यामुळे सुद्धा मतदारांमध्ये त्यांच्याविषयी मोठी नाराजी होती. त्याबाबत “पिंपरी चिंचवड बुलेटिन” अर्थात “पीसीबी” ने निवडणूक काळात सडेतोड राजकीय विश्लेषण वाचकांसमोर मांडले. शिवाजीराव आढळराव पाटील यांची सीट यंदा धोक्यात असल्याची बातमी “पीसीबी टुडे”ने दिली होती. ती आढळराव पाटील यांच्या पराभवामुळे तंतोतंत खरी ठरली.
Home Notifications “पीसीबी टुडे”ने दिलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले; शिवाजीराव आढळराव पाटलांचा झाला पराभव