पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ३१ धावांनी पराभव; भारताला मालिकेत १-० अशी आघाडी

0
699

अॅडलेड, दि. १० (पीसीबी) – येथील पहिल्या कसोटीत भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा ३१ धावांनी पराभव केला. भारताने विजयासाठी ३२३ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना २९१ धावांपर्यंत मजल मारता आली. अष्टपैलू पॅट कमिन्स आणि कर्णधार टीम पेन यांनी खेळपट्टीवर ठाण मांडून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. भारताच्या वेगवान माऱ्यासमोर कांगारुं तग धरू शकले नाहीत. या विजयामुळे भारताने ४ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.