पवना धरणातून 3500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग

0
166

पिंपरी दि. २४ (पीसीबी) – पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातून 3500 क्युसेकने आज (बुधवारी) सकाळी साडे अकरापासून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे पवना नदी तिरावरील सर्व गावातील नागरिकांनी सर्तक राहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जुलै महिन्याच्या मध्यापासून जोरदार हजेरी लावली आहे. धुंवाधार पाऊस पडला. त्यामुळे धरणातील येवा वाढला. अनेकवेळा पाण्याचा विसर्ग करावा लागला. मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर पुन्हा पवना धरण परिसरात पावसाने हजेरी लावली. धरणात सध्या 100 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणा-या पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळी साडेअकरा वाजल्यापासून धरणाच्या वीज र्निमिती संचाद्वारे 1400 तर सांडव्यातून 2100 असे 3 हजार 500 क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात येत आहे.