न विचारता बिस्किट खाल्ल्याने विद्यार्थ्याला डोक फुटेपर्यंत मारहाण; माऊली वारकरी शिक्षण संस्थेतील घटना

0
675

औरंगाबाद, दि. १७ (पीसीबी) – न विचारता दोन बिस्किट खाल्ली म्हणून इयत्ता चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला संस्थाचालकाने डोक फुटेपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवार (दि.११ जुलै) औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील निल्लोडच्या माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात घडली.

निरंजन सतीश जाधव असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी संस्थाचालक महाराज रामेश्वर महाराज पवार विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निरंजनला ११ जुलैला मारहाण झाली होती. मात्र त्याच्यावर कोणतेही उपचार केले नाहीत. 14 जुलैला निरंजनची आई पालक भेटीसाठी शाळेत गेली होती, त्यावेळी हा प्रकार तिच्या निदर्शनास आला. निरंजनने पाच रुपयांच्या बिस्किटांचा पुडा न विचारता घेऊन त्यातील दोन बिस्किट खाल्ली. याचा राग आल्याने निवासी शाळेचे संस्थाचालक महाराज पवारने निरंजनला वायरने डोक फुटेपर्यंत मारल. याप्रकरणी पोलिसांनी रामेश्वर महाराज पवार यांना ताब्यात घेतले आहे.