अमिताभ यांच्यासारखे लोक सामाजिक मुद्द्यांवर चित्रपट करतात. पण प्रत्यक्षात  भूमिका घ्यायची वेळ आली की मौन बाळगतात – तनुश्री दत्ता

0
692

मुंबई, दि.१ (पीसीबी) – अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने आता महानायक अमिताभ यांना लक्ष्य केले आहे. ‘अमिताभ यांच्यासारखे लोक सामाजिक मुद्द्यांवर चित्रपट करतात. पण प्रत्यक्षात  भूमिका घ्यायची वेळ आली की मौन बाळगतात,’ अशा शब्दांत तिने नाराजी व्यक्ती केली आहे.

तनुश्री व नाना वादावर आतापर्यंत अनेक कलाकारांनी स्वत:ची मते मांडली आहेत. अनेक कलाकारांनी तनुश्रीला जाहीर पाठिंबा दिला आहे. तर, गणेश आचार्यसारख्या लोकांनी नानाला क्लिन चिट दिली आहे. मात्र, अमिताभ व आमिर खान यांच्यासारख्या काही बड्या अभिनेत्यांनी त्यावर कोणतेही भाष्य करणे टाळले आहे. त्यांच्या या भूमिकेविषयी तनुश्रीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषत: अमिताभ यांच्या अलिप्ततेबद्दल तिने आश्चर्य व्यक्त केलेय. ‘हे लोक सामाजिक आशय, विषय असलेले चित्रपट करतात. मात्र, प्रत्यक्ष जीवनात अशा मुद्द्यांवर भूमिका घेण्याची वेळ आली की काहीच बोलत नाहीत. किंवा गोलमाल उत्तरे देऊन वेळ मारून नेतात, असे ती म्हणाली.

तनुश्रीच्या या वक्तव्यावर अमिताभ बच्चन काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता सिनेसृष्टीचे आणि त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.