पिंपरी, दि. १ (पीसीबी) – रमाबाईनगर येथील चिमुकलीवर ज्या नराधमांनी अमानुष अत्याचार करून पुरावा नष्ट करण्याचा दृष्टीने ठार मारले, अशा राक्षस वृत्तीच्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करत भाट समाज तरुण मंडळाच्या वतीने भाटनगर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे नागरिकांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला.
या प्रसंगी भाट समाज तरुण मंडळाचे कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक, मुले मुली आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.