पुणे, दि.२३ (पीसीबी) – वाढदिवसाचा केक. चॉकलेट आणि अंगठीचे फोटो आणि “खर्या प्रेमाचा शेवट नसतो कारण खर प्रेम कधीच संपत नाही,” अशी पोस्ट फेसबुकवर आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करून तरूणाने संपवले जिवन
समीर एकनाथ भसे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरूण रविवारी सकाळी दहाच्या सुमारास समीर एका दुचाकीवरून इंदोरीच्या इंद्रायणी नदीच्या पुलावर आला. तो फोनवर कुणाशी तरी बोलत होता. त्यानंतर मात्र काही क्षणातच त्याने पुलावरून थेट इंद्रायणी नदीत उडी घेतली. शेजारी काही अंतरावर काहीजण मासे पकडत होते, त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. परंतु, तोपर्यंत समीर हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी यांची माहिती पोलिसांना दिली. आत्महत्या करण्यापूर्वी समीरने ‘खर्या प्रेमाचा शेवट नसतो कारण खर प्रेम कधीच संपत नाही….बदामाचे चिन्ह आणि मॅसेज फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करून समीरने आपले जीवन संपवले. फोटो आणि लिहिलेल्या मजकूरावरून प्रेमप्रकरणातून त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. समीरने एक चिठ्ठीही लिहिली होती, त्यात आपल्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, स्व:इच्छेने जीवन संपवत असल्याचे त्याने म्हटले आहे.